tag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post7183080331923499940..comments2011-08-04T01:06:58.346-07:00Comments on मातीवरच्या रेघा: अण्णांचं उपोषणkabir manusmarehttp://www.blogger.com/profile/14558999178146073433noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post-11107802210135330482011-04-13T01:22:03.015-07:002011-04-13T01:22:03.015-07:00(copied 4m facebook)
लोकपाल विधेयक घटनाविरोधी नाही...(copied 4m facebook)<br />लोकपाल विधेयक घटनाविरोधी नाही. पण जनलोकपाल विधेयकाच्या मसुद्यात अण्णा आणि मंडळींनी ज्या मुद्यांचा आग्रह धरला आहे, त्यातल्या काही तरतुदी अधिकारांचं केंद्रीकरण करण्याला प्रोत्साहन देणा-या आहेत. ते धोकादायक ठरू शकते. पण हा मसुदा जसाच्या तसा मंजूर व्हावी, अशी हट्टी भूमिका अण्णा आणि मंडळींनी घेतलेली नाही, त्यामुळे सहमतीतून अंतिम मसुदा तयार होऊ शकतो. केवळ सरकारच्या प्रतिनिधींनी तयार केलेल्या मसुद्यापेक्षा हा मसुदा चांगलाच असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण सध्याची प्रस्थापित सिस्टीम वाईट आणि भ्रष्ट आणि आम्ही म्हणू तेच खरं अशी दुराग्रही भूमिका अण्णांना लोकशाहीत घेता येणार नाही, घेतली तरी पुढं रेटता येणार नाही. सरकारी बाजूने आक्षेप हा होता की मसुदा ठरवणे आणि विधेयकाची एकंदर प्रक्रिया ही संसदेच्या अखत्यारितली बाब आहे आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणून संसद सदस्यांनाच तो हक्क आहे. पण व्यापक लोकशाहीचे मूल्य लक्षात घेतले तर जर लोकांनाच आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांच्या हितसंबंधांमध्ये अडकलेले असल्याने जनतेच्या हिताचे कायदे करण्यात कमी पडत आहेत किंवा काही प्रमाणात कुचकामी ठरत आहेत, असं वाटत असेल तर मसुदा ठरवण्याच्या समितीत सरकारबाह्य लोकांचा समावेश योग्यच ठरतो. अण्णांनी उपोषण केलं म्हणजे तो म्हणतील तसा आणि लगेचच कायदा होण्याची प्रक्रिया होईल असं जे चित्र काही जणांच्या मनात उमटलं आहे ते भाबडेपणाचं आणि व्यापक लोकशाही राज्यप्रक्रियेबद्दलच्या सोयिस्कर अज्ञानाचंच लक्षण आहे. सरकारवर जनमताचा दबाव असला पाहिजे, ही जो लोकांची रास्त अपेक्षा आहे तिला अण्णांनी या आंदोलनाच्या रूपाने एक मूर्त रूप दिलं आहे, या चैकटीपुरताच विचार करायला हवा, असं मला वाटतं.Ramesh Jadhavnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post-74951030988995574972011-04-13T01:19:52.475-07:002011-04-13T01:19:52.475-07:00(cut paste from facebook) अण्णा सामान्य जनतेच्या म...(cut paste from facebook) अण्णा सामान्य जनतेच्या मनातील बोलतात हा मुद्दा खरा आहे. आणि त्यांचं बोलणं अगदी साध्या भाषेत असतं त्यामुळे ते भिडतं हे सुध्दा मान्य करावं लागेल. पण एखादं आंदोलन सिस्टीममध्ये मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने करायचं असेल आणि ते तार्किक शेवटापर्यंत न्यायचं असेल तर त्यासाठी जी बौध्दिक क्षमता लागते त्याचा मात्र अण्णांच्यात अभाव आहे हे थोडं भावना बाजूला ठेऊन मान्य करायला पाहिजे. गांधीजींची सगळी आंदोलनं बघितली तर त्यांची उंची आणि कुवत लक्षात येते. अण्णा गांधीजींच्या तंत्राचं अनुकरण करतायत ते ठीक आहे पण ते त्या उंचीला पोहोचण्याचा फसवा दावा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रितीने करतात तेव्हा ती एक प्रकारची फसवणूक ठरतेय. माझं मत सम्राटच्या मताच्या नेमकं उलटं आहे. अण्णांना आंदोलनाचा इव्हेन्ट नीट मॅनेज करता येतो, आंदोलन यशस्वी करता येत नाही. आता जे आंदोलन सुरू आहे त्याची कल्पक नेपथ्यरचना आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याचं ज्या प्रकारे रसभरीत वर्णन सुरू केलं आहे ते पाहिलं तर हा इव्हेन्ट नीट मॅनेज केला नाही, असं कुणालाच म्हणता येणार नाही. अर्थात या वेळी अण्णांनी खूप हुशारीने नेमक्या मागण्या मांडल्या आहेत, त्यामुळे हे आंदोलन या मागणीपुरते तरी यशस्वी होईल, याची मला खात्री वाटते. जनलोकपाल विधयेक व्हायला पाहिजे यात दुमत नाही. पण अण्णांना जयप्रकाश नारायण आणि महात्मा गांधी यांच्या पंक्तीत बसवू नका.Ramesh Jadhavnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post-36985136355231400722011-04-13T01:13:39.906-07:002011-04-13T01:13:39.906-07:00खरं आहे. अण्णांच्या हेतुबद्दल कितीही आदर असला तरी ...खरं आहे. अण्णांच्या हेतुबद्दल कितीही आदर असला तरी त्यांना दुसरा गांधी म्हणणं किंवा त्यांना जयप्रकाश नारायणांच्या पंक्तीत नेऊन बसवणं निव्वळ मूर्खपणा आहे. आयबीएन लोकमतसारख्या चॅनेलनी तर अण्णांना लोकनायक हा किताबही बहाल करून टाकला. लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या धर्तीवर आता लोकनायक अण्णा हजारे असं संबोधलं जातंय. माध्यमांचा उथळपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.kabir manusmarenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post-9335196347047037022011-04-13T00:47:46.831-07:002011-04-13T00:47:46.831-07:00now days media is insulting our national heros li...now days media is insulting our national heros like mahatma gandhiby comparing mahatma with anna on 2nd octomber there are to much potocipys of gandhijiAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post-12978125423996325462011-04-06T15:29:51.066-07:002011-04-06T15:29:51.066-07:00kahi nahi 2-3 divasat atapel sara...khup vel tikan...kahi nahi 2-3 divasat atapel sara...khup vel tikanar nahi...ani tasahi sarkar ekhati aahe tyamule te kahihi karu shaktat...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4645044580110492721.post-57102758769668962982011-04-06T10:08:44.725-07:002011-04-06T10:08:44.725-07:00शरद पवार करतात तो भ्रष्टाचार ही अण्णांची भ्रष्टाचा...शरद पवार करतात तो भ्रष्टाचार ही अण्णांची भ्रष्टाचाराची व्याख्या मला मान्य नाही.Anonymousnoreply@blogger.com